ताणतणाव व लवचिकता

ताणतणावाचा सामना कसा करावा हे प्रमोद आणि कल्पना यांना माहीत होते पण दोघात लवचिकता नव्हती म्हणून संसाराचे सुर बेसुरे झाले होते. अधिक लवचिक कसे व्हावे म्हणून एक चर्चा त्यांच्या बरोबर केली.  

जर आपल्याला जीवनातील आव्हाने (मोठ्या आणि किरकोळ दोन्ही) अधिक सहजतेने हाताळण्यास, प्रतिकुलता वाढण्यास आणि संभाव्य नकारात्मक घटनांतून सकारात्मक बदल करण्यास इच्छित असाल तर काही गोष्टी केल्यास ताणतणावात अधिक लवचिक होण्यास मदत होऊ शकते.

 

१. योग्य दृष्टीकोन विकसित करणे. लवचिक स्वभावाची माणसे आव्हानांना व्यवस्थित तोंड देतात, त्याकडे ते सकारात्मक नजरेने पाहतात.

२. भावनिक जागरूकता. आपण अस्वस्थ का आहात हे जाणून घेतल्याने आपल्या जीवनात काय बदलले पाहिजे याची माहिती मिळू शकते.

३. अंतर्गत नियंत्रणाचे नियोजन. परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण आपण कसा प्रतिसाद देतो हे आपण नियंत्रित करू शकतो,

४. आशावाद वाढवणे. यामुळे सकारात्मक गोष्टी ओळखुन त्यावर काम करणे सोपे जाते व कमकुवतपणा आणि अडचणी यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होतो.

५. सामाजिक सहभाग. काही प्रश्न सुटत नाहीत त्यावेळी समाजातील योग्य व्यक्तींचा सल्ला व समुपदेशन मदत करते.

६. विनोदबुद्धी. आपण आयुष्यातील निराशेवर हसण्यास सक्षम असाल तर ताणतणाव आणि संकटांना तोंड देण्याची प्रतिकारशक्ती वाढवू शकतो.

७. व्यायाम. व्यायामाचा संबंध लवचिकतेच्या मजबूत पातळीशी संबंधित आहे.

८. आपल्या अध्यात्मिक स्वभावाला चालना. जेवढे आपण अध्यात्मिक, तेव्हढे आपण लवचिक बनतो.

९. हार न मानणे. सर्वात यशस्वी व्यक्ती म्हणजे दीर्घकालीन प्रयत्नांची पराकाष्ठा करणे.

लवचिक माणसांची स्वभाव वैशिष्ट्ये असतात. त्यांना परिस्थिती, त्यांच्या स्वतःच्या भावनिक प्रतिक्रियांबद्दल आणि आजूबाजूच्या लोकांच्या वागण्याविषयी माहिती असते. अशा व्यक्ती भावनिक ताणतणाव दूर करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. काय आहेत वैशिष्ट्ये.

 

१. भावनिक नियंत्रण. मानसिकता प्रचंड सकारात्मक असते.

२. समस्या सोडवण्याची कौशल्ये

३. मजबूत सामाजिक कनेक्शन.

४. हरलेला म्हणून नव्हे तर वाचलेला म्हणून ओळख.

५. मदतीसाठी विचारण्यास सक्षम असणे.

६. नम्रता व विनयशीलता.

७. शारीरिक व मानसिकदृष्ट्या कणखर.

८. इतरांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता.

९. प्रसंगी इतरांना मदत करण्यास तयार.

 

प्रमोद आणि कल्पना यांना वरील बाबतिक जाणीव करून दिल्यानंतर थोडे हायसे वाटले कारण बऱ्याच गोष्टी त्यांना सकारात्मकतेने घेणे जमणारे होते. सुखी संसाराची सूत्रे अशीच सुदृढ ठेवावी लागतात. नाहीतर अपयश येण्याची भीती वाटते. आज तणाव व्यवस्थापन आपण करतो पण त्याच बरोबर लवचिक राहिलो तर अनेक कलह दूर होतील व मनःशांती भंग होणार नाही.

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *