बदल माझ्यातला

 

कुणीतरी सकाळी फोन करून विचारले की आपल्या ब्लॉग वरून तुम्ही विवाहपूर्व समुपदेशन असे लिहिले आहे आणि माझं एक प्रश्न आहे. “सर, माझे लग्न ठरलंय! पण मला माझ्या काही सवयी आणि विचारसरणी बदलावी लागेल का?” हा त्याचा प्रश्न मात्र मला विचारात टाकून गेला. खरंच आपल्याला बदलावे लागेल का दुसऱ्या व्यक्तींकरिता? मग आयुष्यात येणारी बायको किंवा नवरा, हॉस्टेल चा रूम पार्टनर, फॅक्टरी / ऑफिस मधील नवीन बॉस, सहकारी इत्यादी अशा अनेक व्यक्तींबरोबर आपल्याला राहावे लागते. मग परिस्थितीशी संघर्ष करून आपण आपले स्थान ज्या त्या ठिकाणी निश्चित करत असतो. आपण बारकाईने निरीक्षण केले तर जाणवेल कि बदल केल्यामुळे आपल्यात काय बदल होतोय:

१. निरोगी संबंध राखणे.
२. आपण बदललो कि समोरची व्यक्ती सुद्धा बदलते वा प्रयत्न करताना दिसते. (अन्यथा सरळ सांगून हे झाले नसते)
३. स्वतःचे मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यात बऱ्यापैकी यश.
४. माणुसकी असेल तर समोरची व्यक्ती आपल्या चुका झाल्या तर समजून घेते.
५. एकमेकांना मदतीची – टीमवर्क ची सवय लागते.
६. उणीव असतील तर बोलून, समजावून सांगण्याची वृत्ती.
७. बऱ्याच अंशी कामाच्या ठिकाणी वरिष्ठ मंडळी तुमचे मत ऐकायला तयार होतात.

अशा अनेक फायदेशीर गोष्टी होत असताना काही नकारात्मक बाबी सुद्धा आहेत, परंतु त्या कशा हाताळायचा त्या आपल्या समजदारीवर अवलंबून असते.

१. स्वभावाचा फायदा उचलणे- अशावेळेस नम्रपणे नकार द्यायचा अधिकार आपला असतो.
२. आपण ऐकतो म्हणून समोरील व्यक्ती जास्त काम देण्याची शक्यता असते अशा वेळी कुठले काम आपण करतोय, ते केल्याने भविष्यात फायदा होतोय का, याचा विचार केला तर जास्त काम केल्याचे फळ नक्कीच चांगले असू शकेल.
३. समोरील व्यक्ती आपल्यावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करू शकते. जेंव्हा मी माझ्यात बदल करतो तेंव्हा मी सक्षम आहे हे समोरील व्यक्तीला दाखवत असतो, विकनेस म्हणून नाही – असा प्रयत्न सुरुवातीपासून ठेवला तर फारच छान.
४. मानसिक किंवा शारीरिक त्रास होणे. अशावेळेस समोरील व्यक्तीला आपल्या त्रासाची कल्पना जरूर द्या.
५. आपल्या कडून अपेक्षा वाढणे – त्यांचा अपेक्षा भंग कधी तरी त्रास दायक ठरतो. म्हणून लक्ष्मण रेखा पहिल्यापासून आखली तर हा त्रास होत नाही.

प्रत्येकजण स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत असतो. मग तो आपला जोडीदार असो कि जोडीदारीण, मालक असो वा असोसिएट – तुम्ही एकमेकांना महत्व दिले कि अर्धी लढाई इथेच जिंकता. मी कुणाला बदलवू शकत नसेल तर माझा मानसिक त्रास कमी करण्यासाठी मी काय करू शकतो हे आपल्याच हातात असते. विचार करून बघायला हरकत नाही, आनंदी जीवन जगण्यासाठी बदल आवश्यक आहे.

@श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *